पाठीमागच्या बरेच दिवसापासून महाराष्ट्र राज्य मध्ये "एक घर एक रेशनिंग कार्ड" योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा डुप्लिकेट रेशन कार्ड बंद करून खड्डा गरजुवंत आणि गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य ऊपलब्ध करून देणे हा आहे.
या लोकांची होणार रेशन कार्ड कायमस्वरूपी रद्द-
या योजनेचा मुख्य उद्देश डुप्लिकेट रेशन कार्ड बंद करणे हा असल्याने आता ज्या ज्या एकाच घरामध्ये ४-५ रेशन कार्ड आहेत आणि असे रेशनकार्ड धारक त्यांच्या गरजेपेक्षा जास्त धान्य हे डुप्लिकेट रेशन कार्ड काढून मिळवतात, परिणामी ज्यांना खरच स्वस्त दरात धान्य ची गरज आहे त्यांना ते मिळत नाही परिणामी अनेक जण या पासून वंचित राहतात.
या जिल्ह्यात आहेत सर्वात जास्त डुप्लिकेट रेशन कार्ड धारक
महाराष्ट्र राज्यातील मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत केलेल्या निरीक्षण नुसार राज्यातील 232000 रेशन कार्ड हे डुप्लिकेट असल्याचे आढळून आले आहे. आणि त्यापैकी जवळ जवळ 1लाख 27000 रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहेत.
* नागपूर -24821
- जळगाव-9897
- कोल्हापूर-8332
- पालघर-8032
- ठाणे-7268
- नांदेड-6525
वरील जिल्हयात सर्वात जास्त भोगस रेशनिंग कार्ड आढळून आले आहेत. आणि यांवर कारवाई पण झाली आहे. आता ही मोहीम सर्व राज्यात लवकरच वेगाने काम करणार असून आणखी बरीच रेशनिंग कार्ड भोगस असणाऱ्यांचे रेशनिंग कार्ड रद्द करण्यात येईल.
आता, याचा फायदा काय होईल?
तर आता येथुन पुढे एकाच घरात अनेक रेशन कार्ड असल्याने त्यांना विनाकारण जास्तीचे धान्य जात असल्याने गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा कमी पडत होते पण आता डुप्लिकेट रेशन कार्ड रद्द करून त्या सर्व जणांना एकच रेशन कार्ड वरती आणण्यात येणार असल्याने त्यांना मिळणार भोगस धान्य पुरवठा कमी होणार असल्याने खरे गरजुवंत व्यक्तिंना याचा लाभ होणार आहे.